Sat. Jul 27th, 2024

बोर्डाची  प्रश्नांची उत्तरे आता या विद्यार्थ्यांना दोन्ही भाषेत लिहिता येणार शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय.. SSC HSC board exam 2024

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्त्व दिले असून राज्यात मराठीतून व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केले आहेत. आता तंत्रविद्यानिकेतन (पॉलिटेक्निक) आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका आता मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.
एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना पेपरमधील उत्तरे देखील दोन्ही भाषेत लिहिता येणार आहेत,’’ अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित ‘डीईएस पुणे विद्यापीठा’चे उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, डीईएस विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, सचिव धनंजय कुलकर्णी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
‘‘आपले विद्यार्थी हुशार आहेत, परंतु विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी पडत आहेत. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्य वाढविण्यासाठी शिक्षण संस्था, विद्यापीठांनी उपक्रम राबवायला हवेत,’’ असे पाटील यांनी सुचविले.

SSC HSC board ! दहावी बारावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार ..  👇👇

पाटील म्हणाले, प्राध्यापकाने कोणत्याही भाषेत शिकवावे आणि विद्यार्थ्यांना ते आपल्या भाषेत ऐकू येईल, असे सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. अभ्यासक्रमातील संकल्पना विद्यार्थ्यांना मातृभाषेतून अधिक चांगल्याप्रकारे समजतात,
हे लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला आणि भारतीय संस्कृती, परंपरेला महत्त्व दिले आहे. त्यामुळे देशाची परंपरा, संस्कृती हा विषय विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांनी अभ्यासक्रमात आणावा, यासाठी सरकार आग्रही राहणार आहेत…
डॉ. जेरे म्हणाले, ‘‘पुढील २५ वर्षातील जगाचा विचार करून शैक्षणिक क्षेत्राची रचना करणे आवश्यक आहे. नव्या काळात आवश्यक असणारे मनुष्यबळ हे पारंपरिक व्यवस्थेपेक्षा भिन्न असणार आहे. त्यामुळे विद्यापीठांनी नव्या काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असणारे मनुष्यबळ निर्मितीसाठी पावले उचलायला हवीत.
आपल्याकडे असणाऱ्या कौशल्यांतील नवे बदल आणि आणखी उच्च कौशल्ये शिकण्यासाठी पुढील काळात दर दहा वर्षांनी तरुण शिक्षण संस्थांकडे वळणार आहेत. त्यासाठी विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांनी तयार असणे अपेक्षित आहे
….
छत्रपती शाहू महाराज म्हणाले,‘‘नव्याने सुरू केलेले विद्यापीठ केवळ अध्ययन केंद्र न राहता येथील विद्यार्थी भविष्यातील नेतृत्व घडविणारे असतील. हे विद्यार्थी वैभवशाली भूतकाळ आणि उज्ज्वल भविष्याला जोडणारा सेतू ठरतील.’’ कार्यक्रमात डॉ. कुंटे यांनी विद्यापीठामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आचार्य यांनी आणि सूत्रसंचालन स्वाती सातपुते यांनी केले. कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले आहेत..

‘‘राज्यात आतापर्यंत दीड हजार शिक्षण संस्थांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. परंतु उच्च शिक्षण संस्थांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी न केल्यास अशा संस्थांना जगातील कोणत्याही विद्यापीठांची संलग्न होण्याची दारे खुली राहतील. परंतु या शिक्षण संस्था कोणत्याही भारतीय विद्यापीठांशी संलग्न राहणार नाहीत..
असे चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.  यांनी सांगितले आहे..

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/L56k5MRXBDvG2kjXrQHZKK

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *