Sat. Jul 27th, 2024

विद्यार्थ्यांनो, अभ्यास करा अन्‌ मिळवा २१००० !

जलजीवन मिशन’अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचे महत्त्व व जलसंवर्धन, याविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने शाळांमध्ये जिल्हा व तालुकास्तरीय निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिली आहे. त्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा- महाविद्यालयांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकिले, माध्यमिकच्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केले आहेत..

पिण्याचे पाणी, पाणी पुरवठा योजना व त्यात लोकसहभाग, योजना कार्यान्वित झाल्यावर योजनेची देखभाल व योजना कायम सुरू राहण्यासाठी पाणीपट्टी वसुली व स्रोत बळकटीकरणासाठी जलसंवर्धनाचे महत्त्व शालेय जीवनापासूनच रुजावे, या हेतूने जलशक्ती मंत्रालय आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे या स्पर्धा पार पडणार आहेत. प्राथमिक व माध्यमिक अशा गटात स्पर्धा होतील. शालेय स्तरावरून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी तालुका स्तरावर एकत्रित करून तालुकास्तरावर क्रमांक निवडले जातील. तालुकास्तरावरून प्राप्त स्पर्धकांतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक घोषित केले जाणार आहेत. दोन्ही गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांना अनुक्रमे २१ हजार, ११ हजार व साडेपाच हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे..

चित्रकला स्पर्धेचे विषय

– पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणीपुरवठा, जल संवर्धन व पाण्याचे महत्त्व, पाण्याचे वितरण व करप्रणाली, पाणीपुरवठा योजनेतील लोकसहभाग, पाणीपुरवठा योजनेची देखभाल- दुरुस्ती

– महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती, जलसंवर्धन.

———————————————————-

निबंध स्पर्धेसाठी असे असणार विषय

– पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणीपुरवठा, जलजीवन मिशन व माझ्या गावाचा विकास, जलसंवर्धन काळाची गरज

– दोन्ही गटातील निबंधाची शब्द मर्यादा १५०० असून वेळ ४० मिनिटांचा राहणार आहे.

वक्तृत्व स्पर्धामध्ये….

महाविदयालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती जल संवर्धन या वक्तृत्व स्पर्धामध्ये उच्च माध्यमिक (११ वी व १२वी) महाविदयालयीन (पदवीधर) विदयार्थी सहभागी होऊ शकतात. उच्च माध्यमिक (११ वी, १२ वी) महाविदयालयीन स्तरावरून प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी तालुकास्तरावर एकत्रीत करून तालुकास्तरावर १ ते ३ क्रमांक निवडले जातील. तालुकास्तरावरून प्राप्त स्पर्धकांतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक घोषित केले जाणार आहेत. जिल्हास्तरावर दोन्ही गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणा-या विद्यार्थ्यांना अनुक्रमे २१,००० , ११,००० व ५,५०० रूपये रोख बक्षीस, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे आहे

सर्व update साठी व PDF file साठी What’s app group जॉईन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93j2zJJhzaKxMLHn0y

दहावी बारावी बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/D2TUqZEc53mLg9lfvVI1iJ

Facebook Page ला फॉलो करा👇👇
https://www.facebook.com/Nana-Foundation-105547428725897/

पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- nana foundation

https://youtube.com/c/nanafoundation

Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक खालील प्रमाणे आहे
http://www.instagram.com/nana_foundation7

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा
https://t.me/n_f07

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *